Sunday, September 19, 2010

उत्तरांचा पाया ठिसूळच

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना ठार करण्यासाठी आयबी आणि ब्राह्मणत्त्वाचा पुरस्कार करणा-या (सनातनी) संघटनांनी ही घटना घडवल्याचा दावा मुश्रीफ करतात. पण त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांचे हे पुस्तक उभे आहे ते घटनेच्या काळात विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर.

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना ठार करण्यासाठी आयबी आणि ब्राह्मणत्त्वाचा पुरस्कार करणा-या (सनातनी) संघटनांनी ही घटना घडवल्याचा दावा मुश्रीफ करतात. पण त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांचे हे पुस्तक उभे आहे ते घटनेच्या काळात विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर. त्यामुळे हा पायाच ठिसूळ होतो. अशा प्रकारच्या हल्ल्याचे वार्ताकन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने उत्साहाच्या भरात अनेकांनी चुकीच्या, दिशाभूल करणा-या बातम्या दिल्या होत्या. त्या नंतर खोट्या ठरल्या. त्यामुळे त्यांची विश्वसनीयता कितपत मानावी, हा प्रश्न उरतोच. गिरगाव चौपाटीजवळची चकमक बनावट होती असे मानले तर त्यात तुकाराम ओंबळेंना जीव कसा गमवावा लागला, हा प्रश्नही आहेच.

राज्याचे पोलिस महानिरीक्षकपद भूषवलेल्या अधिका-याने अशा प्रकारे केवळ बातम्यांवर आधारित स्वत:चे निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उरतोच.

करकरे यांच्यासह अशोक कामटे, विजय साळसकर हे अधिकारीही २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले होते. पण त्यांना तिथे बोलावलेच कोणी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी त्यांच्या पुस्तकातूनही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे व्हू किल्ड करकरे हे पुस्तक बातम्यांवर आधारित असल्याने विश्वसनीयतेसमोर प्रश्नचिन्ह लागत असले तरी करकरे त्या वेळी तेथे कसे गेले, हा प्रश्न उपस्थित होतोच. करकरे शहीद झाले त्याच दिवशी अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्याबाबत आलेली वृत्ते आणि करकरेंचे वीरमरण यांची संगती लावण्याचा प्रयत्नही झाला होता. करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते, त्या प्रकरणाच्या किती बातम्या नंतरच्या काळात वाचल्या हे आठवून पाहिले तरी काहीतरीघडले असावे, असा संशय उपस्थित होतोच.

हू किल्ड करकरे

लेखक- एस. एम. मुश्रीफ (माजी पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र)

प्रकाशक- फारोस मीडिया अँड पब्लिशिंग प्रा. लि. नवी दिल्ली

पाने- ३१९, किंमत - ३०० रु. (बुकस्ट्रीटवर २०० रु.)

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष उलटत असताना या हल्ल्याबद्दलची जी पुस्तके चर्चेत आली,त्यापैकी एक हू किल्ड करकरे. या पुस्तकातील मते आणि तथाकथित निष्कर्ष पटणारे नाहीत, असाच सूर अनेकांनी लावला आहे. एवढे काय आहे या पुस्तकात, की त्यावर बंदी आणण्याच्या मागणीपर्यंत काहीजणांची मजल जावी? हे पुस्तक टाकाऊ ठरवायचे की त्याचे महत्त्व अनाठायी वाढवायचे, हे ठरवण्याचा हक्क प्रहार बुकमार्कचे वाचक म्हणून तुम्हालाही आहेच..

अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा अपयशी प्रयत्न

१९ नोव्हेंबर २००९ रोजी आयबीला (गुप्तचर विभाग) मिळालेली माहिती ते गिरगाव चौपाटीवर २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या चकमकीच्या काळातील घटना तर्कसुसंगत पद्धतीने मांडल्या तर पुढीलप्रमाणे घटनाक्रम उलगडत जातो.

१ - मुंबईच्या किना-यावर रबरी बोटींतून १० नव्हे तर आठ पाकिस्तानी दहशतवादी आले होते.

२ - आठपैकी सहा जण बधवार पार्कजवळच्या भाई चिंदरकर मच्छिमार कॉलनीजवळ उतरले तर उरलेले दोघे तिच बोट घेऊन ओबेरॉयच्या दिशेने गेले.

३ - बधवार पार्कजवळ उतरलेल्या सहा जणांनी हॉटेल ताजमहल, कॅफे लिओपोल्ड आणि नरिमन हाऊसमध्ये हिंसाचार घडवला तर उरलेल्या दोघांनी हॉटेल ट्रायडंट आणि ओबेरॉयमध्ये रक्तपात घडवला.

४ - सीएसटी, कामा रुग्णालय आणि रंगभवनची गल्ली येथे रक्तपात घडवणारे दहशतवादी पाकिस्तानातून आलेले नव्हते तर इथलेच स्थानिक होते.

- सीएसटी, कामा रुग्णालय आणि रंगभवनच्या गल्लीत झालेला हिंसाचार हा देशभरात दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या ब्राह्मणी विचारसरणीने आणि आयबीमधील त्यांच्या हिंतचिंतकांनी योजनाबद्ध रीतीने घडवून आणला. या मंडळींची कट उघड करणा-या करकरेंचा खातमा करणे, हा या मंडळींचा मुख्य उद्देश होता.

पुढे उल्लेख केलेल्या घटनांवरून हा उद्देश स्पष्ट होईल.

१ - हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) हिंदुत्वावाद्यांचा (ब्राह्मणी) दहशतवाद उघडा पाडला होता व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह अनेक बाह्मणी संघटनांच्या आघाडीच्या ब्राह्मणी नेत्यांना अटक करण्यापासून अगदी काही अंतरावर ते होते. त्यामुळे ब्राह्मणवर्गात आणि या घटकांना पाठिशी घालणा-या आयबीमध्ये मोठे काळजीचे वातावरण होते. या म्होरक्यांना वाचवण्यासाठी आयबीतील ब्राह्मणवादी मंडळी विविध गोपनीय ऑपरेशनच्यापर्यायांचा विचार करत होते. त्यातच काही दहशतवादी भारतात प्रवेश करणार असल्याची गोपनीय माहिती अमेरिका आणि रॉकडून मिळाल्यानंतर त्यांना ही आयतीच संधी चालून आली.

२ - या गोपनीय माहितीबाबत मुंबई पोलिस किंवा नौदलाच्या पश्चिम विभागाला जागरूक करण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्रातील आपल्या म्होरक्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. कोणत्याही कारवाईबाबत आम्ही इशारा केला की दहशतवाद्यांच्या कारवाईच्या वेळी पूर्ण सज्जतेने आपली कारवाई पार पाडा, असे आयबीतील ब्राह्मणी अधिकाऱ्यांनी बजावले.

३ - महाराष्ट्रातील ब्राह्मणी मंडळींनी सहा ते आठ तरुणांची आधीच निवड करून त्यांना नागपूर आणि पुणे येथील तळांवर प्रशिक्षण दिले होते.

इ या युवकांचे प्रत्येकी दोन अशा गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यांना काही कडव्या ब्राह्मणी नेत्यांनी आणि आयबीतील सेवेत असलेल्या तसेच काही निवृत्त अधिका-यांनी प्रत्येक गटाची भूमिका ठरवून दिली होती. त्याचबरोबर त्यांना कशा प्रकारे काम करायचे आहे हे प्रत्यक्ष नकाशावरही समजावून सांगितले होते.

५ - दहशतवादी भारतात येण्याची शक्यता वर्तवल्याच्या काही दिवस आधीपासून या युवकांना सज्ज राहण्यास सांगितले होते.

६ - मुंबईच्या किना-यांवर दहशतवादी उतरताच या युवकांनाही तात्काळ आपली कामगिरी करण्यास बजावले होते. त्यासाठी त्यांनी इशारा होताच सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय आणि एसबी कार्यालय या आधीच निश्चित केलेल्या ठिकाणांजवळ हल्ला चढवावा, असे सांगण्यात आले होते.

७ - ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस या ठिकाणांजवळ पाकिस्तानी दहशतवादी पोहोचल्याचे निश्चित होताच, या युवकांना त्यांची मोहीम फत्ते पाडण्यासाठी दुसरा इशारा केला जाणार होता.

८ - त्यासाठी या मंडळींना विशेष मोबाइल फोन देण्यात आले होते. या मोबाइल फोनमधील सिम कार्ड ही प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातून मिळवली होती. या मोबाइल फोनशिवाय अन्य फोन किंवा सिम कार्ड वापरण्याची त्यांना परवानगी नव्हती.

९ - सुरुवातीला सीएसटीत गोळीबार सुरू झाला व त्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कामा रुग्णालयात गोळीबार सुरू झाला. सीएसटीची कामगिरी पार पाडून तेथील टोळी टाइम्स ऑफ इंडियाच्या शेजारच्या गल्लीतून पुढे सरकण्यास सांगितले होते. तिच्यावर अन्य टोळ्यांसाठी बॅकअपची जबाबदारी होती.

१० - हेमंत करकरे हल्ल्याच्या कोणत्याही ठिकाणी पोहोचताच त्यांना कामा रुग्णालयाजवळ बोलावण्याची योजना आयबीच्या संबंधित अधिका-यांनी तयार केली होती.

११ - हे अधिकारी नजरेच्या टप्प्यात येताच, गोळीबार करून त्यांचे ध्यान आकर्षित करण्याची जबाबदारी एसबी कार्यालय,रंगभवन येथील टोळीवर होती.

१२ - हेमंत करकरे त्यांच्या रेंजमध्ये येताच या एसबी कार्यालय, रंगभवनच्या टोळीने जबाबदारी पार पाडली.

१३ - आपली कारवाई पूर्ण झाल्याचा संकेत त्यांनी देताच त्यांना तात्काळ त्यांच्या ठरलेल्या जागी सुरक्षितपणे निघून जाण्यास सांगितले गेले.

१४ - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने आयबीने त्यांच्या स्टॉकमधील दोन दहशतवाद्यांना स्कोडा गाडीतून चकमकीसाठी संबंधित ठिकाणी नेले. मात्र, त्यातील एकाला जिवंत ठेवण्याची काळजी घेतली.

या सर्व घटना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे घडल्या. पण, युद्धात किंवा कुठेही आखलेली योजना प्रत्यक्ष कारवाई यांच्यात काहीतरी अंतर राहतेच त्याप्रमाणे त्यांनीही काही मोठ्या चुका केल्या.

अ - सीएसटीतील दोन जणांमध्ये अनेक वर्षापासून मुस्लिम विद्वेषाचे विष पाजले जात होते. त्यामुळे हे दोघे जण मुस्लिमांविरोधातील राग गोळीबाराच्या वेळी विसरू शकले नाहीत. जिहादी मुस्लिम म्हणून काम करण्यासाठी त्यांना दिलेली शिकवण ते विसरून गेले व मुस्लिम पद्धतीची टोपी घातलेल्या व दाढीधारी मुस्लिम पुरुष, मुले, बुरखाधारी महिलांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला.

ब - रेल्वे स्थानकात हा संहार करून झालेल्या टोळीला कामा रुग्णालयाकडे जाणे शक्य झाले नाही. भुयारी मार्ग आणि टाइम्सच्या इमारतीजवळच्या पोलिसांनी त्यांचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे त्यांना मस्जिद बंदर स्थानकाच्या दिशेकडून बाहेर पडावे लागले.

क - गिरगाव चौपाटीजवळजवळच्या पोलिसांनी उत्साहाच्या भरात किंवा समन्वयाच्या अभावाने स्कोडातील दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे आयबीला शेवटच्या क्षणाला तिसरा दहशतवादी स्टॉकमधून काढावा लागला.

(एस. एम. मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे पुस्तकातील काही भागाचा स्वैरानुवाद)

No comments:

Post a Comment