Monday, September 6, 2010

हमारा कल..हमारा आज..

बजाजचं उत्पादन सुरू होण्याआधी जगभरात लँब्रेटा आणि व्हेस्पा या इटालियन कंपन्यांच्या स्कूटरची धूम होती. लँब्रेटा (नंतरच्या काळात लँबी) या स्कूटरचं उत्पादन भारतात ऑटोमोबाइल प्रॉडक्ट ऑफ इंडिया या कंपनीच्या सहकार्यानं सुरू होतं. 1972 मध्ये स्कूटर्स इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं या स्कूटरचं उत्पादन सुरू केलं.

अमेरिकेत अग्निबाण उड्डाण केंद्रावर एक रॉकेट काही केल्या उडत नव्हतं. तिथं काम करणा-या एका भारतीयाने हे रॉकेट उडवून दाखवतो, असं आव्हान दिलं. सर्व अमेरिकी मंडळींनी त्याची खिल्ली उडवली. आमचं इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे,तुमच्यासारखा मागास देशातला माणूस काय हे रॉकेट उडवणार, अशी त्याची फिरकी घेतली. पण आपल्या निर्धारावर ठाम असलेल्या त्या भारतीयानं तिथल्या तंत्रज्ञांना रॉकेट एका बाजूला झुकवायला सांगितलं. त्यानंतर सरळ करून पुन्हा उडवा, असा सल्ला दिला आणि रॉकेटनं आकाशात झेप घेतली. हा विनोद सर्वानाच चांगला माहीत आहे. भारतात अगदी पाच-सात वर्षापूर्वीपर्यंत डौलानं दौडणा-या स्कूटर्स या विनोदाचं प्रेरणास्थान होत्या. या स्कूटर सुरू झाल्या नाहीत, की त्या इंजिनाच्या बाजूनं झुकवल्या जात. पुन्हा सरळ केल्यानंतर कीक मारली की सुरू होत.

समोर हँडलला धरून उभं असणारं एखादं मूल. पाठीमागे वडील आणि आईच्या मध्ये आणखी एखादं मूल. हँडलला खरेदी केलेल्या विविध वस्तूंच्या पिशव्या लटकवलेल्या स्कूटरचं चित्र आपण गेल्या दशकापर्यंत पाहिलं. दोन मुलं असणा-या कुटुंबांसाठी या स्कूटर म्हणजे प्रवासासाठी सोयीचं साधन होतं. सर्वसाधारण बाइकच्या तुलनेत स्कूटरची रचना वेगळी असते. स्कूटरमध्ये चालकाला पाय ठेवण्यासाठी गाडीच्या आतल्या बाजूलाच जागा केलेली असते. समोरूनही ही गाडी बंदिस्त असते. त्यामुळे चालकाचे पाय सुरक्षित असतात. विशेषत: महिलांसाठी या स्कूटर खूपच सुरक्षित आणि चालवायलाही सुटसुटीत होत्या. त्यामुळेच आजही स्कुटी किंवा अ‍ॅक्टिव्हासारख्या स्कूटर खास महिलांच्या म्हणून ओळखल्या जातात. बहुतांश स्कूटरमध्ये इंजिन एका बाजूला कललेलं असल्यानंच तिथं इंधन पोहोचवण्यासाठी गाडी झुकवावी लागायची.

स्कूटरच्या उत्पादनाला जगभरात 1914 च्या सुमारास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांनाही स्वत:च्या मालकीच्या वाहनाचं सुख मिळावं, या संकल्पनेतून इथं स्कूटर आल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र या स्कूटरची पंढरी म्हणता येईल. आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी ‘बजाज’चा मोठा प्लान्ट चाकण इथं होता. त्याशिवाय औरंगाबादजवळच्या वाळूज इथंही एक प्रकल्प होता. आकुर्डी इथला सर्वाधिक जुना प्लान्ट आता कंपनीचं संशोधन आणि विकासकेंद्र बनलाय. सुरुवातीला तरी बजाज कंपनी परदेशातून स्कूटर आयात करून त्या भारतीय बाजारात विकायची. 1959 मध्ये उत्पादनांचा परवाना मिळवल्यानंतर भारतात या स्कूटरच्या उत्पादनाला सुरुवात झाली.

मात्र, बजाजचं उत्पादन सुरू होण्याआधी जगभरात लँब्रेटा आणि व्हेस्पा या इटालियन कंपन्यांच्या स्कूटरची धूम होती. लँब्रेटा (नंतरच्या काळात लँबी) या स्कूटरचं उत्पादन भारतात ऑटोमोबाइल प्रॉडक्ट ऑफ इंडिया या कंपनीच्या सहकार्यानं सुरू होतं. 1972 मध्ये स्कूटर्स इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं या स्कूटरचं उत्पादन सुरू केलं. त्या शिवाय व्हेस्पा या कंपनीच्या स्कूटरचंही भारतात उत्पादन सुरू होतं. पण मक्तेदारी निर्माण केली होती ती बजाजच्या स्कूटरनी. सुपर, चेतक, प्रिया अशा वेगवेगळ्या नावांच्या स्कूटर भारतात धावत होत्या. त्यांच्या बरोबरीनंच 80 च्या दशकात एम 50 आणि एम 80 या वेगळ्या ढंगाच्या स्कूटरही आल्या. त्यातली एम 80 ही स्कूटर कष्टकरी वर्गासाठी जणू वरदान ठरली होती. मात्र, जमाना बदलला तसा या स्कूटर मागे पडू लागल्या. वेगवान जमान्यात त्यांची गती मंदावली. मात्र,स्कूटरची रचना असणा-या अनेक दुचाकी त्याच वेळी मार्केट काबीज करू लागल्या. आता तर मोटारसायकल उत्पादन करणा-या आघाडीच्या कंपन्याही गीअर नसलेल्या स्कूटरच्या उत्पादनाकडे गांभार्यानं पाहू लागल्या आहेत. अशा स्कूटरची सुरुवात कायनेटिक होंडा या स्कूटरनं करून दिली होती. तिच्या पावलावर पाऊल टाकून अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅव्हिएटर, डय़ुरो अशा अनेक स्कूटर भारतीयांना आकर्षित करून घेत आहेत.


No comments:

Post a Comment